आता पर्यंत आपण मराठी चित्रपट व नाटकं यांच्या व्यावसायिक अपयशाची अनेक कारणे बघितली. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो . तो मुद्दा म्हणजे चित्रपट व नाटक यांची जाहिरात .
एखादा उत्तम दर्जाचा ,चांगला प्रभावी चित्रपट केवळ चांगल्या जाहिराती अभावी फ्लॉप होऊ शकतो . आणि अगदी टाकाऊ वाटणारा चित्रपट केवळ जाहिरात चांगली केल्यामुले हिट होऊ शकतो. एका वाक्यात सांगायचं तर आजच्या युगात ‘जाहिरात’ हि चित्रपट व नाटक यांचं नशीब बदलू शकते .
आता जाहिरात म्हणजे नक्की कशी , ते आधी थोडक्यात पाहूयात :-
जाहिरात अनेक माध्यमांतून करता येते . वर्तमानपत्रं , मासिकं , वगैरे सारख्या माध्यमांतून जाहिरात करणे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय सर्वश्रुत आहेच . पण त्याहीपेक्षा प्रभावी पर्याय म्हणजे रेडिओवर जाहिरात करणे. कारण , " आपण जेव्हा एखादी जाहिरात वाचतो ती आपल्या जेवढी लक्षात रहाते त्यापेक्षा ऐकलेली (रेडिओवर) जाहिरात जास्त वेळ लक्षात रहाते."
रेडिओवर जाहिरात देणे :-
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी रेडियो स्टेशन्स खूप लोकप्रिय आहेत . आपल्याकडे रेडिओची शहरानुसार अनेक केंद्रे आहेत, उदा. पुणे केंद्र , मुंबई केंद्र ,इ . त्याचप्रमाणे खासगी केंद्रे ही आहेत उदा . रेडियो मिर्ची , रेडियो सिटी , इ.
सर्व वयोगटातील लोक ही स्टेशन्स आवर्जून ऐकतात . त्यावरील विविध व मनोरंजक कार्यक्रमांमुळे ख़ास करून युवा वर्ग या स्टेशन्सकडे आकर्षित होतो . त्यामुले रेडियो सारखा जुना पर्याय देखील आजही लोकप्रिय आहे.
विशिष्ट प्रकारची गाण्याची चाल लावून तयार केलेली रेडियो जाहिरात ही जास्त प्रभावी असते. ती लोकांच्या जास्त काळ स्मरणात रहाते . अशा प्रकारच्या जाहिरातीला ‘ रेडियो जिंगल ’ असे म्हणतात . ही जाहिरात रेडिओवर देण्यासाठी, जाहिरात आधी एखाद्या 'जाहिरात कंपनी' कडून ध्वनी स्वरूपात तयार करून घ्यावी लागते. ती साधारण १० सेकंद, १५ सेकंद, ३० सेकंद या वेळेच्या स्वरूपात असते .
अशा प्रकारे जाहिरात तयार करून ती वेगवेगळ्या रेडियो स्टेशन्सवर प्रसारणासाठी द्यावी लागते. एक जाहिरात , रेडियो स्टेशन्स वर एकदा प्रसारीत करण्यास रेडियो स्टेशन्स कमीत कमी ८०० ते १२०० रुपये दर आकारतात . त्यानुसार जर आपल्याला १० सेकंदाची एक जाहिरात दिवसातून १० वेला वाजवायची असेल तर, ८ ते १२ हजार रुपये खर्च येऊ शकतो. जाहिरातीची वेळ (१० सेकंद ) वाढल्यास (१५ ते ३० सेकंद) जाहिरात वाजवण्याचा खर्चहि वाढतो . त्याचप्रमाणे सकाळ , दुपार , संध्याकाळ , रात्र अशा वेळेप्रमाणे जाहिरातीचे दर वेगवेगळे असतात . आणि त्याचबरोबर रेडियो स्टेशन्सच्या लोकप्रियतेनुसार ती रेडियो स्टेशन्स जाहिरातीचे दर कमी-जास्त ठेवू शकतात .
आता आपण जाहिरातीचा सर्वात प्रभावी माध्यम बघूयात, ते म्हणजे टि.व्ही .
जसं, "जेव्हा आपण जाहिरात वाचतो, त्यापेक्षा ऐकलेली जाहिरात जास्त वेळ लक्षात राहते," त्याचप्रमाणे ऐकलेल्या जाहिरातीपेक्षा सुद्धा (टी. व्ही. वर) बघितलेली जाहिरात सर्वात जास्त वेळ लक्षात राहते. कारण आपण ती वाचू शकतो, बघू शकतो आणि ऐकू सुद्धा शकतो.
टी . व्ही. जाहिराती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टी. आर. पी . ( टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स ) :- टी. व्ही. च्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भाषेतील वाहिन्या असतात. एखाद्या वाहिनीवरील ,एखादा कार्यक्रम किती लोक बघतात यावरून त्या कार्यक्रमाचा टी. आर. पी. काढतात . जेवढा कार्यक्रम जास्त लोकप्रिय , जेवढे लोक तो कार्यक्रम जास्त वेळा बघतील तेवढा त्या कार्यक्रमाचा वा त्या वाहिनीचा टी. आर.पी.
टी. व्ही. जाहिरात तयार करण्याचा खर्च हा कमीतकमी ७० ते ८० हजार पासून ते काही कोटि पर्यंत असू शकतो. सर्वसाधारणपणे एक उत्तम दर्जाची टी.व्ही. जाहिरात तयार करण्याचा खर्च हा दोन ते अडीच लाख असतो . टी.व्ही. जाहिरात ही देखील १० सेकंद, ३० सेकंद, ६० सेकंद अशा वेळेत असते. टी.व्ही. वरील वाहिन्यांवर जाहिरात देण्याचा खर्च हा देखील दर १० सेकंदाला दिड ते दोन लाख रुपये एवढा असतो. लोकप्रिय वाहिनी आणि लोकप्रिय कार्यक्रम यांच्यानुसार हा खर्च वाढून फार तर १० सेकंदाला ५ ते ६ लाख एवढा असतो. टी.व्ही. जाहिरातीत सुद्धा, सकाळ , दुपार, संध्याकाळ, रात्र अशा वेळेनुसार खर्च कमी-जास्त होतो. दिवसाच्या तुलनेत रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत जाहिरातीचा खर्च हा कमी असतो.
आता आपण अल्पावधीत प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झालेलं जाहिरात माध्यम पाहू : इंटरनेट
इंटरनेट जाहिरात :-
जाहिरात क्षेत्रामध्ये टी. व्ही. जाहिरातीच्या तोडीस तोड़ असे माध्यम म्हणजे ' इंटरनेट जाहिरात' . ज्या प्रमाणे टी.व्ही. वरील जाहिरातीला व्यावसायिक भाषेत ‘कमर्शियल ’ असं म्हणतात. तसंच इंटरनेटवरील जाहिरातीला ‘वेबमर्शियल’ असे म्हणतात. इंटरनेटवर जाहिरात करताना बैनर , वेबमर्शियल , यांसारखे बरेचसे नवनवीन आणि मनोरंजक पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या संगणकयुगात जास्तीत जास्ता तरुण इंटरनेटकडे आकर्षित झालेले आहेत, त्यामुळ इंटरनेट जाहिरातींना टी. व्ही. वरील जाहिरातीच्या तुलनेने थोडासा कमी, परंतु तोडीस तोड़ प्रतिसाद मिळातो.
इंटरनेट वरील जाहिरातीचा खर्च हा कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त ३ लाख असतो. आजकाल बरेचसे चित्रपट निर्माते चित्रपटाची आणि नाटकाची स्वतंत्र वेबसाईट तयार करून घेतात . व त्या वेबसाईट वरून प्रेक्षकांची प्रतिक्रया लगेच मिळू शकते. चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसिद्ध करणे , हे या माध्यमामुळे लवकर साध्य होते . लोक तुमच्या वेबसाईट ला भेट देऊन तुमच्या चित्रपटाची छायाचित्रं , माहिती, गाणी ,इ .पाहू शकतात , ऐकू शकतात, डाऊनलोड करून घेऊ शकतात. आपल्या इतर मित्राना वेबसाइटची लिंक पाठवू शकतात. असे इतर बरेचसे पर्याय इंटरनेट जाहिरात माध्यामामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे " खर्च कमी आणि फायदा जास्त " मिळत असल्याने जाहिरातीच्या या माध्यमाचा वापर अलीकडे वाढला आहे. याचा प्रत्येक निर्मात्याने जरूर विचार करावा.
वर्तामानपत्रं, रेडियो, टी.व्ही. आणि इंटरनेट या चारही जाहिरात माध्यामांचा पुरेपुर वापर करून चांगल्या प्रकारची जाहिरात केली तर कुठलाही चित्रपट वा नाटक व्यावसायिक दृष्टया यशस्वी ठरणारच. त्यासाठी चित्रपट आणि नाटक यांच्या निर्मितीचं बजेट ठरवताना जाहिरातीच्या या प्रमुख चार अंगांचा विचार करून त्यासाठी पुरेसा पैसा बाजूला ठेवणे आणि तो नियोजनाबद्ध पद्धतीने खर्च करणे आवश्यक आहे.
3 Comments
Labels:
DD Sahyadri
,
ETV Marathi
,
IBN Lokmat
,
Marathi Actors Actresses
,
Marathi TV Channels
,
Marathi TV Stars
,
Mee Marathi
,
Saam Marathi
,
Star Majha
,
Star Pravah
,
Zee Chovis Taas
,
Zee Marathi
,
Zee Talkies
'मराठी चित्रपटसृष्टी आणि तिला आलेली अवकळा ' हा आता चावून चोथा झालेला विषय. त्याबद्दलची कारणमीमांसा करायला सर्व बाजूंनी सुरूवात झालेली दिसते. त्यात थोडी भर म्हणून हा अगदी छोटासा लेख.
सध्या बरेच नवनवीन मराठी तरूण , मराठी चित्रपट निर्मितीमध्ये निरनिराळे प्रयोग करत आहेत, जेणेकरून मराठी चित्रपटांना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे. सगळ्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. कारण खरोखरच काही जण मनापासून चित्रपट करतात. काहींना चित्रपट निर्मितीचा नसता अट्टाहास का आहे कोण जाणे. असो.
आता जे नवनवीन मराठी चित्रपट प्रेक्षक बघतात (?) त्यात त्यांना चित्रपट पहाण्यापासून परावृत्त करणारे बरेचसे मुद्दे आहेत कि ज्यावर चर्चा सुद्धा होताना दिसते आहे. त्यांपैकी एक मुद्दा मी इथे मांडू ईच्छितो , कदाचित आधी ह्या मुद्द्यावर चर्चा झालेली असेल, पण माझ्यासाठी हा नवीन आहे , तो मुद्दा म्हणजे सध्याच्या नवीन मराठी चित्रपटाच्या नट्या आणि नट.
सध्या बरेच नवनवीन मराठी तरूण , मराठी चित्रपट निर्मितीमध्ये निरनिराळे प्रयोग करत आहेत, जेणेकरून मराठी चित्रपटांना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे. सगळ्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. कारण खरोखरच काही जण मनापासून चित्रपट करतात. काहींना चित्रपट निर्मितीचा नसता अट्टाहास का आहे कोण जाणे. असो.
आता जे नवनवीन मराठी चित्रपट प्रेक्षक बघतात (?) त्यात त्यांना चित्रपट पहाण्यापासून परावृत्त करणारे बरेचसे मुद्दे आहेत कि ज्यावर चर्चा सुद्धा होताना दिसते आहे. त्यांपैकी एक मुद्दा मी इथे मांडू ईच्छितो , कदाचित आधी ह्या मुद्द्यावर चर्चा झालेली असेल, पण माझ्यासाठी हा नवीन आहे , तो मुद्दा म्हणजे सध्याच्या नवीन मराठी चित्रपटाच्या नट्या आणि नट.

गेल्या ४-५ वर्षांत आलेल्या चित्रपटापासून ते आज-कालच्या , 'साडे माडे तीन' , 'चेकमेट' , इ. इ. पर्यंत सगळ्या चित्रपटांमध्ये असे नट आणि नट्या आहेत ज्यांना सुजाण प्रेक्षक अक्षरशः दररोज टि. व्ही. वरच्या दैनिक मालिकांमध्ये सकाळ-संध्याकाळ पारायणं केल्यासारखं पहात असतात. तेव्हा पुन्हा त्यांनाच घेऊन तुम्ही चित्रपट कसे काय काढता ? चित्रपट काढण्यामागे केवढी स्वप्नं असतात ते मला माहिती आहे, म्हणूनच मला जरा जास्तच आश्चर्य वाटतंय. नवनवीन कलाकार घेऊन चित्रपट काढायला काय होतं ? त्यामुळे नवीन चेहर्यांना संधी मिळेल. मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या चांगल्या कलाकारांचा भरणा होईल. जरा मराठी प्रेक्षकांना कमनीय बांध्याच्या युवती आणि पिळदार शरीरयष्टीचे नट बघू देत की. आणखी किती दिवस , सदान् कदा चेहर्यावर बारा वाजलेल्या ,रडारड करणार्या नट्या आणि पोट सुटलेले नट बघायचे त्यांनी ? मराठी तरूण-तरूणींच्या बेडरूम मध्ये, बाथरूम मध्ये, बेडवर , उशीखाली, दरवाजाच्या मागे, वगैरे मराठी नट-नट्यांचे फोटो कधी जाऊन बसणार ? आणि नवीन कलाकारांना चित्रपटात संधी देण्याचा आणखी एक फ़ायदा म्हणजे तुमचे प्रस्थापित कलाकारांना देण्याचे मानधनाचे पैसे वाचतील. कारण नवीन कलाकार प्रस्थापित कलाकारांपेक्षा तुलनेने कमी पैसे घेतात. (तसं पाहिलं तर, प्रस्थापित कलाकारांनादेखील कितपत मानधन मिळतं याबाबतच प्रश्नचिन्ह आहे )राहिला प्रश्न तो हा, की नवीन नवीन कलाकारांना संधी देत गेलं की, प्रस्थापित कलाकारांना कामं कशी मिळणार ?
हा प्रश्न सर्वस्वी कलाकाराने ज्याचा त्याचा सोडवायला हवा , तुम्हाला नक्की कुठलं क्षेत्र निवडायचं ते. एकतर दूरचित्रवाणी मालिका किंवा मग चित्रपट किंवा नाटक. म्हणजे मराठी प्रेक्षक जेव्हा जेव्हा मालिका, नाटक आणि चित्रपट यांचा आस्वाद घ्यायला जाईल, तेव्हा त्याला प्रत्येक क्षेत्रात नवनवीन चेहरे पहायला मिळतील. कंटाळवाणं वाटणार नाही. बॉलीवूड , टॉलीवूड किंवा इतर कोणत्याही प्रांतातील चित्रपटसृष्टीतले कलाकार याबाबत फ़ार चोखंदळ असतात. त्यामुळे ते यशस्वी ठरतात.
मुद्दा जरी लहानसा असला तरी याचा विचार व्हायला हरकत नसावी.
मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही, वगैरेच्या चर्चा सध्या कुठे ना कुठे मराठी चित्रपटप्रेमींच्या तोंडून ऐकू यायला लागल्या आहेत. आणि त्याविषयी आधी लिहून झालेलं असल्या कारणाने, आता इथे फ़क्त मराठी चित्रपटाच्या शीर्षकांचाच मुद्दा मांडतो.
आता आपल्याकडे आधीच मराठी चित्रपटांची जगजाहीर अशी दूर्दशा , त्यात विचित्र प्रकारची शीर्षकं कशी काय देतात हे लोक त्यांच्या चित्रपटाला ? गेल्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटाच्या नावांची यादी पहायला गेलं तर डोकं चक्रावून जाईल :- पांढर, डोह, क्षण, नितळ, सखी, दोघी, धग,निरोप, इ,इ. ..... काय चाललंय हे ? मान्य आहे तुमच्या ह्या समर्पक शीर्षकांचा चित्रपटाच्या कथेशी जवळचा संबंध असतो, पण अशी शीर्षकं ठेवून नाही चालत हल्ली... फ़ारतर फ़िल्म फ़ेस्टीवल्समध्ये दोन-चार पुरस्कार मिळतील तुमच्या चित्रपटाला, बाकी कुणाही सामान्य प्रेक्षकाला कळणारसुद्धा नाही की अमुक अमुक नावाचा चित्रपट मराठीत येऊन गेला म्हणून. जर सामान्य प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचलाच नाही, तर काय उपयोग चित्रपट काढून ? एवढा खर्च करून, कित्येक दिवस उराशी बाळगून असलेलं स्वप्न साकारायची संधी मिळते , ती अशी वाया घालवायची का ?
चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्याच्या शीर्षकाचाही तितकाच उपयोग असतो. कित्येकदा तर केवळ शीर्षकावर चित्रपट यशस्वी होतात. हिंदीत तर सध्या अंकशास्त्रानुसार चित्रपटांची नावं ठेवायचं फ़ॅड आलंय, करण जोहर आणि राकेश रोशनची ' क' ची बाराखडी तर याचा उत्कृष्ट नमुना आहे. (कुछ कुछ होता है पासून कभी अलविदा ना कहना पर्यंत....... आणि कामचोर पासून क्रीश पर्यंत)
मराठीत तुम्ही असले काही प्रयोग करा अशी कुणाचीही ईच्छा नाही. ( जर अंकशास्त्रावर विश्वास असेल तर प्रयत्न करून पहायला अगदीच काही हरकत नाही घेणार कुणी..)
आता आपल्याकडचे सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांचं उदाहरण घ्यायला हरकत नाही. या दोघांची उदाहरणं देण्यामागचा उद्देश एवढाच की, दोघांच्या कामाच्या पद्धती निराळ्या असल्या तरी दोघेही यशस्वी आहेत. जर तुम्हाला तुमच्या चित्रपटाच्या नावात अजिबात बदल करायचा नसेल, तुम्ही त्याबद्दल अतिशय ठाम असाल , तर मग तुम्ही तुमच्या चित्रपटात एकतर महेशजींसारखं काहीतरी यू. एस.पी. निर्माण करायला हवं . म्हणजे महेश कोठरेंचा चित्रपट म्हटला कि काही गोष्टी ठरलेल्या असतात, म्हणजे त्याचं शीर्षक पाच अक्षरी च असणार (धूमधडाका , झपाटलेला पासून ते खबरदार, जबरदस्त पर्यंत..) , त्यांचा 'लक्ष्या', त्यांचं स्वतःच नाव 'इन्स्पेक्टर महेश जाधव ', वगैरे वगैरे ... त्यामुळे त्यांच्या चित्रपटाविषयी लोकांना कायमच उत्सुकता असते आणि त्यांचे चित्रपट म्हणूनच यशस्वी ठरतात. (अर्थात् त्यांच्या चित्रपटाची कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय वगैरे जमेच्या बाजू असतातच, त्याबद्दल दुमत नाही. पण इथे हे नमूद करण्यामागचा उद्देश हा की चित्रपटाच्या शीर्षकात काही विशेष बदल न करता चित्रपट यशस्वी होतो)
किंवा मग सचिनजींच्या सारखं नेहमी वेगळं आणि आकर्षक शीर्षक ठेवायला हवं. (मायबाप , अशी हि बनवाबनवी , पासून नवरा माझा नवसाचा पर्यंत...) इथे कुठलीही गोष्ट रीपीट नसते, प्रत्येक वेळी सगळं नवं नवं... कथा,पटकथा ,गाणी..... त्यामुळे इथे प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते कि ह्यावेळेस सचिनजींच्या चित्रपटात काय वेगळं पहायला मिळणार ?

प्रेक्षकांच्या मनात आपल्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होणे ह्यात एका दिग्दर्शकाचं फ़ार मोठं यश आहे. आणि म्हणूनच चित्रपटाच्या शीर्षकांचा सुद्धा विचार व्हायला हवा, कारण..... " जर तुम्हीच तुमच्या चित्रपटांना चांगली नावं नाही ठेवलीत, तर मग लोकच तुमच्या चित्रपटांना 'नावं ' ठेवतील. ! "
आता आपल्याकडे आधीच मराठी चित्रपटांची जगजाहीर अशी दूर्दशा , त्यात विचित्र प्रकारची शीर्षकं कशी काय देतात हे लोक त्यांच्या चित्रपटाला ? गेल्या काही वर्षांत आलेल्या चित्रपटाच्या नावांची यादी पहायला गेलं तर डोकं चक्रावून जाईल :- पांढर, डोह, क्षण, नितळ, सखी, दोघी, धग,निरोप, इ,इ. ..... काय चाललंय हे ? मान्य आहे तुमच्या ह्या समर्पक शीर्षकांचा चित्रपटाच्या कथेशी जवळचा संबंध असतो, पण अशी शीर्षकं ठेवून नाही चालत हल्ली... फ़ारतर फ़िल्म फ़ेस्टीवल्समध्ये दोन-चार पुरस्कार मिळतील तुमच्या चित्रपटाला, बाकी कुणाही सामान्य प्रेक्षकाला कळणारसुद्धा नाही की अमुक अमुक नावाचा चित्रपट मराठीत येऊन गेला म्हणून. जर सामान्य प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचलाच नाही, तर काय उपयोग चित्रपट काढून ? एवढा खर्च करून, कित्येक दिवस उराशी बाळगून असलेलं स्वप्न साकारायची संधी मिळते , ती अशी वाया घालवायची का ?
चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्याच्या शीर्षकाचाही तितकाच उपयोग असतो. कित्येकदा तर केवळ शीर्षकावर चित्रपट यशस्वी होतात. हिंदीत तर सध्या अंकशास्त्रानुसार चित्रपटांची नावं ठेवायचं फ़ॅड आलंय, करण जोहर आणि राकेश रोशनची ' क' ची बाराखडी तर याचा उत्कृष्ट नमुना आहे. (कुछ कुछ होता है पासून कभी अलविदा ना कहना पर्यंत....... आणि कामचोर पासून क्रीश पर्यंत)
मराठीत तुम्ही असले काही प्रयोग करा अशी कुणाचीही ईच्छा नाही. ( जर अंकशास्त्रावर विश्वास असेल तर प्रयत्न करून पहायला अगदीच काही हरकत नाही घेणार कुणी..)
आता आपल्याकडचे सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांचं उदाहरण घ्यायला हरकत नाही. या दोघांची उदाहरणं देण्यामागचा उद्देश एवढाच की, दोघांच्या कामाच्या पद्धती निराळ्या असल्या तरी दोघेही यशस्वी आहेत. जर तुम्हाला तुमच्या चित्रपटाच्या नावात अजिबात बदल करायचा नसेल, तुम्ही त्याबद्दल अतिशय ठाम असाल , तर मग तुम्ही तुमच्या चित्रपटात एकतर महेशजींसारखं काहीतरी यू. एस.पी. निर्माण करायला हवं . म्हणजे महेश कोठरेंचा चित्रपट म्हटला कि काही गोष्टी ठरलेल्या असतात, म्हणजे त्याचं शीर्षक पाच अक्षरी च असणार (धूमधडाका , झपाटलेला पासून ते खबरदार, जबरदस्त पर्यंत..) , त्यांचा 'लक्ष्या', त्यांचं स्वतःच नाव 'इन्स्पेक्टर महेश जाधव ', वगैरे वगैरे ... त्यामुळे त्यांच्या चित्रपटाविषयी लोकांना कायमच उत्सुकता असते आणि त्यांचे चित्रपट म्हणूनच यशस्वी ठरतात. (अर्थात् त्यांच्या चित्रपटाची कथा, पटकथा, कलाकारांचा अभिनय वगैरे जमेच्या बाजू असतातच, त्याबद्दल दुमत नाही. पण इथे हे नमूद करण्यामागचा उद्देश हा की चित्रपटाच्या शीर्षकात काही विशेष बदल न करता चित्रपट यशस्वी होतो)
किंवा मग सचिनजींच्या सारखं नेहमी वेगळं आणि आकर्षक शीर्षक ठेवायला हवं. (मायबाप , अशी हि बनवाबनवी , पासून नवरा माझा नवसाचा पर्यंत...) इथे कुठलीही गोष्ट रीपीट नसते, प्रत्येक वेळी सगळं नवं नवं... कथा,पटकथा ,गाणी..... त्यामुळे इथे प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते कि ह्यावेळेस सचिनजींच्या चित्रपटात काय वेगळं पहायला मिळणार ?

प्रेक्षकांच्या मनात आपल्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होणे ह्यात एका दिग्दर्शकाचं फ़ार मोठं यश आहे. आणि म्हणूनच चित्रपटाच्या शीर्षकांचा सुद्धा विचार व्हायला हवा, कारण..... " जर तुम्हीच तुमच्या चित्रपटांना चांगली नावं नाही ठेवलीत, तर मग लोकच तुमच्या चित्रपटांना 'नावं ' ठेवतील. ! "
Labels:
Marathi Actors Actresses
,
Marathi Films
,
Marathi Short Films
,
Pune International Film Festival
आज नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र चाळताना त्यामध्ये 'पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीवल २००८' ची जाहिरात पाहिली आणि मागच्याच वर्षीच्या ह्याच फ़िल्म फ़ेस्टीवलच्या थरारक आठवणी ताज्या झाल्या......
फ़िल्म फ़ेस्टीवलला जायचं असेल तर ५०० रू. ची डेलिगेट प्रवेशिका विकत घ्यावी लागते , ती घ्यायला म्हणून 'पुणे मॅरेथॉन भवन' मध्ये गेलो सकाळी १० ची वेळ दिलेली होती, पण ११:३० वाजले तरी आम्ही रिकाम्या हातीच होतो.. . त्यांच्यापैकी कुणीही आलेलं नव्हतं, माझ्या सारखेच काही जण लवकर येऊन थांबले होते, शेवटी कसंबसं १२ च्या आसपास प्रवेशिका मिळाली. त्यात सतराशे साठ भानगडी.. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांना प्रवेशिका रू. ३०० ला मिळते. पण त्यासाठी वयाचा पुरावा दाखवावा लागतो...तिकडे एक आजी बाई होत्या, त्यांच्या वयाच्या पुराव्या वरून तिथे जरा गडबड झाली, त्या म्हणत होत्या की त्यांची साठी ओलांडली आहे म्हणून, पण त्यांच्याकडचा पुरावा जीर्ण झाल्या असल्या कारणाने त्यांना ते सिद्ध करता येत नव्हतं, आणि तिथले स्वयंसेवक त्या आजींना 'साठी'च्या मानायला तयार नव्हते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला अशा फालतू कारणावरून उगाच मनस्ताप देण्यापेक्षा (एक तर स्वतः आधी उशीरा येऊन, सगळ्यांना उन्हामध्ये २ तास तिष्ठत ठेवलं होतं ) देऊन टाकली असती एक ३०० रू. ची प्रवेशिका तर काय बिघडलं असतं ? आता त्या नाही वाटत साठ वर्षांच्या यात त्यांची काय चूक ? मनस्ताप झाला खरा, पण त्या काही वाद नाही घालत बसल्या, शेवटी त्यांच्यासाठी हि एक ईनडायरेक्टली कॉम्प्लिमेंटच होती ना.. की "अजून तुम्ही तरूण दिसता वगैरे.." या बायका कधी कशा रीएक्ट होतील ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही. ....... असो.
तर हा माझा पहिला अनुभव होता, फ़ेस्टीवल सुरू होईल तेव्हा काय काय बघणं माझ्या नशिबात आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.
शेवटी एकदाचा उद् घाटनाचा दिवस उजाडला. त्यादिवशी पासूनच खरी मजा यायला लागते. कारण गर्दी खेचण्यासाठी म्हणून बर्याचदा बडे फ़िल्मस्टार्स आणतात हे लोक. आणि कुठे काय बोलावं हे माहित नसल्याने इथे फ़ेस्टीवलमध्ये आल्यावर एकेकाची बौद्धिक झेप कळते. असं काही अगाध ज्ञान ते लोक पाझळतात की थक्क व्हायला होतं आणि प्रश्न पडतो की नक्की आपण ह्यांचेच चित्रपट बघतो का ? चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिणार्याच्या कर्तुत्त्वाची इथे आपल्याला जाणीव होते आणि त्यांचं कौतुक करावसं वाटतं... तसं जुन्या लोकांना आता हळूहळू जमायला लागलंय प्रेक्षकांशी आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधणं वगैरे.. असो.
आता फ़ेस्टीवल सुरू झालेला असल्यामुळे एकेका गमती-जमतींना सुरूवात झालेली असते. कुणाला 'हवी असलेली' जागा बसायला मिळत नाही, मग तो ज्याला 'ती जागा' मिळाली आहे त्याला त्याचं समाधान लाभू देत नाही. फ़ॉरेन फ़िल्म्स् कॅटॅगरी मध्ये बर्याचशा फ़िल्म्स् मध्ये कधी कधी 'प्रौढांसाठी' चे सीन्स् असतात. त्यामुळे कुणी आपल्या मित्रांना फ़ेस्टिवलला खास 'तसले ' सीन्स् दाखवण्याकरता आणलेलं असतं. त्याची पण एक गम्मत आठवतेय मला, मल्टिप्लेक्स मध्ये एकाच वेळी ४-४ स्क्रीन्स वर फ़िल्म्स् चालू असतात, त्यामुळे नक्की कुठली फ़िल्म बघायची असा नेहमी गोंधळ होतो, अशातच एक उतावळा नमुना मागच्या वर्षी पहायला मिळाला, आम्ही ईटॅलियन फ़िल्म पहात होतो, आणि तो विचित्र मनुष्य दुसर्या स्क्रीनवरची फ़िल्म अर्धवट सोडून पटकन आमच्या इथे आला, आणि फोनवरून बाकीच्या मित्रांना बोलावत होता आमच्या स्क्रीन मध्ये..कारण त्याला त्याच्या कुणा एका मित्राने सांगितलं होतं (ज्याने हा चित्रपट आधी बघितलेला होता ) की, ती फ़िल्म सुरू झाल्यावर बरोब्बर ४५ मिनिटांनी आणि त्यानंतर २० मिनिटांनी असे दोन 'तसले ' सीन्स् आहेत आणि ते अगदी 'जमून' आलेयत. म्हणून तो बरोब्बर वेळेत आला होता... केवढी हि ओढ ? केवढी चित्रपटनिष्ठा ? आम्ही पुन्हा एकदा थक्क....!
एवढं करून ६० मिनिटं होऊन गेली तरी तो सीन येईना, म्हणून शेवटी तो वैतागला आणि घड्याळाकडे एक नजर टाकत, आमच्या स्क्रीनमधून धावत पळत दुसर्या स्क्रीनकडे पळाला, बहुतेक तिकडेही ह्याचं असंच कसलंतरी कॅल्क्युलेशन असणार... तो ईथून निघून गेला आणि ते दोन्ही सीन्स आले, आम्ही नेत्रं विस्फ़ारून ते पाहून घेतले ...खरंच जमून आले होते ते.. त्या बिचार्याचं दुर्दैव..... नक्कीच त्याचं घड्याळ बिघडलेलं असणार त्या दिवशी... कारण आमच्या ईथली फ़िल्म संपल्यावर जेव्हा आम्ही प्रेक्षागृहाच्या बाहेर आलो, तेव्हा तो दिसला आम्हाला....त्याचा चेहराच सांगत होता की त्याचे त्या फ़िल्म मधले सुद्धा 'ते' सीन्स बघायचे हुकले असणार... असे रग्गड नमुने आपल्याला फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये पहायला मिळतात.
फ़िल्म फ़ेस्टीवलबद्दल एक प्रचलित गैरसमज आहे की, तिथे फ़क्त ' प्रौढांसाठीचे च' किंवा बोअर , फ़्लॉप झालेले चित्रपट दाखवतात म्हणून.....पण तसं अजिबात नाहिये. ह्या गैरसमजाबद्दलचा सुद्धा एक किस्सा आहे, तो असा..
एक सद् गृहस्थ आपल्या फ़ॅमिलीला घेऊन फ़िल्म फ़ेस्टिवलला आले होते, त्यांनी एका तरूणांच्या चमूला विचारलं कि कुठले चित्रपट फ़ॅमिलीने बघण्याजोगे आहेत ? त्या तरूणांनी त्यांना सहकुटुंब-सहपरिवार , त्यादिवशीच्या खास " फ़क्त प्रौढांसाठीच" असलेल्या स्क्रीनमध्ये नेऊन बसवलं ... एकेक दृश्य समोर येताना त्या सद् गृहस्थांची काय अवस्था झालेली हे आख्ख्या प्रेक्षागृहाच्या नजरेतून लपलं नव्हतं , नंतर १० मिनिटांतच ते तिथून उठून निघून गेले...ते डायरेक्ट घरीच गेले असावेत.... कारण दिवसभरात कुठे दिसलेच नाहीत ते आम्हाला आख्ख्या मल्टिप्लेक्स मध्ये.... त्यामुळे तुमची अशी 'जाहीर फ़जिती' होऊ नये असं वाटत असेल तर सावध रहा.......
प्रत्येकाला इथे सगळ्या चित्रपटांची माहिती असलेलं माहितीपत्रक फ़ुकट मिळतं ते घ्यावं , किंवा मग चित्रपट सुरू व्हायच्या आधी प्रेक्षागृहाबाहेरच्या लोकांबरोबर ओळखी करून घ्यावात, त्यांना विचारावं की कुठले चित्रपट खरंच दर्जेदार आहेत, (अर्थात इथे तुमचं लक तुमच्या बरोबर असायला हवं की तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल आणि तिच्याकडून योग्य माहिती मिळेल ) .. मन पूर्वग्रहदूषित असेल तर तुम्हाला चित्रपटाचा निखळ आनंद उपभोगता येणार नाही.
ईथे सगळ्याच जॉनर मधले,सगळ्याच कॅटॅगरीमधले चित्रपट दाखवले जातात. कधी कधी तर आपण आपल्या रूटीन लाईफ़ मध्ये जे चित्रपट बघतो त्यापेक्षा 'जरा हटके' चित्रपट बघायला मिळतात, उच्च कोटीतले चित्रपट,दिग्दर्शकाची दृष्टी म्हणजे नेमकं काय, वगैरे हे सगळे आपल्याला ते चित्रपट बघितल्यावर कळतं. ईथे नेहमी येणारे जे लोक आहे, त्यांना शोधून (?) त्यांच्याशी ओळख करून घावी व ती वाढवावी, कारण कधी कधी फ़िल्म ईंडस्ट्रीमधल्या व्यक्तींकडे/संस्थांकडे सुद्धा मिळणार नाही अशी माहिती त्या लोकांकडे आपल्याला सचित्र स्वरूपात पहायला मिळते. आणि ते लोक ती माहिती कुणाशीही सहजासहजी शेअर करत नाहीत. ईथे डोकं चालवायला लागतं ती माहिती मिळवण्यासाठी... त्यातही वेगळीच मजा येते. ज्या लोकांना फ़िल्मलाईन मध्ये करीअर करायचं आहे त्यांनी तर जेवढे जास्त फ़िल्म फ़ेस्टिवल अटेंड करावेत तेवढं चांगलं . माझं स्वतः चं असं स्पष्ट मत आहे की, ज्याला एक परीपूर्ण ,प्रगल्भ आणि यशस्वी चित्रपट कारकीर्द करायची ईच्छा आहे त्याला हे फ़िल्म फ़ेस्टिवल्स् म्हणजे आयतं मिळालेलं ट्रेनिंग सेंटर आहे. (अर्थात् त्यासाठी एकलव्याचे गुण अंगी असायला हवेत, कारण तिथे तुम्हाला कुणी सांगायला येत नाही की, अमुक अमुक सीन कसा शूट केलाय, कॅमेरा आणि लाईट्स् कसे सेट केले आहेत, स्टुडिओ शॉट ला ईस्टॅब्लिश्ड शॉट चा ईफ़ेक्ट कसा आणलाय, वगैरे, वगैरे... ) त्यासाठी एक लहानशी डायरी आणि एक पेन जवळ ठेवावं, म्हणजे महत्त्वाची टिपणं लगेच टिपून घेता येतात.
ह्याच फ़िल्म फ़ेस्टीवलला एक 'रोमॅंटीक कॉर्नर' सुद्धा आहे, ईथे बर्याच जणांच्या 'जोड्या' जुळतात, एका फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये ओळख झाली की ती ओळ्ख वाढत जाते, म्ग पुन्हा दुसर्या कुठल्यातरी फ़िल्म फ़ेस्टीवलला भेट होते, असं करत करत नंतर मग , एकट्याने फ़ेस्टीवलला येणारे 'दुकटे' होऊन एकमेकांचा निरोप घेतात, (कधी कधी पुढच्या वर्षी तेच चेहरे आपल्याला पहायला मिळतात , फ़क्त त्यांचे पार्टनर्स बदललेले असतात.)
रूटीन लाईफ़ मध्ये फ़िल्म बघणं आणि फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये फ़िल्म बघणं यात तुलनाच करता येत नाही. घरी सुद्धा एखादा जुना चित्रपट बघताना क्वचित कंटाळाल्यासारखं होऊ शकेल, पण ईथे तसं कधीही होणार नाही. ईथे त्या चित्रपटात गुंग झालेली लोक पण पहायला मिळतात आणि तिथेच दुसरीकडे त्या चित्रपटावर कॉम्प्लीमेंट्स् पास करणारे टगे पण पहायला मिळतात, छान करमणूक होते.
तिथे येणार्या प्रत्येकाचे पोशाख सुद्धा कित्येकदा विचित्र असतात, खास करून तिथे येणार्या सगळ्या 'मॉड' आजीबाईंचे आणि आजोबांचे पोशाख, त्यांच्या अक्सेसरीज, अगदी धाडसाला दाद देण्याजोगं सगळं .... आमच्या आजी-आजोबांना कुणी हा अवतार दाखवू नका म्हणजे झालं....
आता थोडे वादाचे मुद्दे मांडतो...
जगात सर्वत्र फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबाबत बोलूच आपण, पण आपल्याकडे जे फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबद्दल बोलायचं तर , आयोजक नेहमी मल्टिप्लेक्स मध्येच चांगले ,दर्जेदार आणि विदेशी चित्रपट लावतात, आणि बाकिची जी ठिकाणं ठरवलेली असतात तिथे आपलेच जुने चित्रपट लावतात (जे चित्रपट केबल टि.व्ही. वर बघून बघून आपली त्याची पारायणं झालेली असतात), उदा. सांगायचं तर 'पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये' , पुण्यातल्या सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये जी मुख्य 'पुणे गाव' (म्हणजे स्वारगेट, किंवा महत्त्वाच्या पेठा ,वगैरे) परीसरापासून दूर आहेत, तिथे सगळे परदेशी आणि दर्जेदार चित्रपट आणि 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ', 'गणेश कला-क्रीडा मंच' वगैरे ठिकाणी सगळे जुने भारतीय चित्रपट, असं का ? ईथल्या क्राऊडला सुद्धा परदेशी चित्रपट पहयचे असतात, त्यामुळे त्यांच्या सोईसाठी इथे सुद्धा परदेशी चित्रपट लावायला हवेत. फ़ेस्टीवल चालू असताना दररोज भाडं खर्च करून इतक्या लांब जाणं खिशाला परवडत नाही. आणि मल्टीप्लेक्स परीसरातील क्राऊड (आयनॉक्स, ई-स्क्वेअर, वगैरे) बर्यापैकी श्रीमंत आहे, आणि जसं आपल्याकडचा क्राऊड कायम भारतीय जुने चित्रपट बघत आलेला आहे, तसंच तो क्राऊड देखील कायम परदेशी चित्रपट बघणारा आहे. त्यामुळे उलट त्यांना भारतीय चित्रपट पहायला मिळावेत म्हणून तिथे तुम्ही भारतीय जुने चित्रपट लावा. आणि इथे परदेशी चित्रपट लावा. म्हणजे ज्याला जे रोजच बघायला मिळतं त्यापेक्षा काहितरी वेगळं बघायला मिळेल आणि 'फ़ेस्टीवल' या शब्दाचा खर्या अर्थाने त्यांना उपभोग घेता येईल. हाच मुद्द पुन्हा सोई-सुविधांसाठी सुद्धा मांडता येईल. त्या सगळ्यांना समान मिळायला हव्यात. परदेशी पाहुण्यांच आदरातिथ्य आपण करायला हवं , हे अगदी १०० % मान्य, पण त्यासाठी घरच्या पाहुण्यांना दुखावू नका.
अशाच अनेक आठवणी , भरमसाठ किस्से , चांगले-वाईट अनुभव, यातून बरंच काही शिकायला मिळतं, अगदीच काही नाही तरी एका वेगळ्या दुनियेत राहून आल्याचा आनंद मिळतो आणि तोच सर्वश्रेष्ठ असतो. कित्येक नवोदीत फ़िल्ममेकर्स आपली स्वप्नं घेऊन तिथे आलेले असतात. त्यातूनच एखाद्याला 'ब्रेक' मिळाला तर त्याच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ठरतो. अशा उगवत्या कलाकारांच्या कलाकृती आपल्याला तिथे पहायला मिळतात. त्यामुळे मी तर म्हणेन की, सगळे गैरसमज मनातून काढून टाका, आणि मुक्त मनाने फ़िल्म फ़ेस्टीवलचा आस्वाद घ्या.
फ़िल्म फ़ेस्टीवलला जायचं असेल तर ५०० रू. ची डेलिगेट प्रवेशिका विकत घ्यावी लागते , ती घ्यायला म्हणून 'पुणे मॅरेथॉन भवन' मध्ये गेलो सकाळी १० ची वेळ दिलेली होती, पण ११:३० वाजले तरी आम्ही रिकाम्या हातीच होतो.. . त्यांच्यापैकी कुणीही आलेलं नव्हतं, माझ्या सारखेच काही जण लवकर येऊन थांबले होते, शेवटी कसंबसं १२ च्या आसपास प्रवेशिका मिळाली. त्यात सतराशे साठ भानगडी.. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांना प्रवेशिका रू. ३०० ला मिळते. पण त्यासाठी वयाचा पुरावा दाखवावा लागतो...तिकडे एक आजी बाई होत्या, त्यांच्या वयाच्या पुराव्या वरून तिथे जरा गडबड झाली, त्या म्हणत होत्या की त्यांची साठी ओलांडली आहे म्हणून, पण त्यांच्याकडचा पुरावा जीर्ण झाल्या असल्या कारणाने त्यांना ते सिद्ध करता येत नव्हतं, आणि तिथले स्वयंसेवक त्या आजींना 'साठी'च्या मानायला तयार नव्हते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला अशा फालतू कारणावरून उगाच मनस्ताप देण्यापेक्षा (एक तर स्वतः आधी उशीरा येऊन, सगळ्यांना उन्हामध्ये २ तास तिष्ठत ठेवलं होतं ) देऊन टाकली असती एक ३०० रू. ची प्रवेशिका तर काय बिघडलं असतं ? आता त्या नाही वाटत साठ वर्षांच्या यात त्यांची काय चूक ? मनस्ताप झाला खरा, पण त्या काही वाद नाही घालत बसल्या, शेवटी त्यांच्यासाठी हि एक ईनडायरेक्टली कॉम्प्लिमेंटच होती ना.. की "अजून तुम्ही तरूण दिसता वगैरे.." या बायका कधी कशा रीएक्ट होतील ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही. ....... असो.
तर हा माझा पहिला अनुभव होता, फ़ेस्टीवल सुरू होईल तेव्हा काय काय बघणं माझ्या नशिबात आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.
शेवटी एकदाचा उद् घाटनाचा दिवस उजाडला. त्यादिवशी पासूनच खरी मजा यायला लागते. कारण गर्दी खेचण्यासाठी म्हणून बर्याचदा बडे फ़िल्मस्टार्स आणतात हे लोक. आणि कुठे काय बोलावं हे माहित नसल्याने इथे फ़ेस्टीवलमध्ये आल्यावर एकेकाची बौद्धिक झेप कळते. असं काही अगाध ज्ञान ते लोक पाझळतात की थक्क व्हायला होतं आणि प्रश्न पडतो की नक्की आपण ह्यांचेच चित्रपट बघतो का ? चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिणार्याच्या कर्तुत्त्वाची इथे आपल्याला जाणीव होते आणि त्यांचं कौतुक करावसं वाटतं... तसं जुन्या लोकांना आता हळूहळू जमायला लागलंय प्रेक्षकांशी आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधणं वगैरे.. असो.
आता फ़ेस्टीवल सुरू झालेला असल्यामुळे एकेका गमती-जमतींना सुरूवात झालेली असते. कुणाला 'हवी असलेली' जागा बसायला मिळत नाही, मग तो ज्याला 'ती जागा' मिळाली आहे त्याला त्याचं समाधान लाभू देत नाही. फ़ॉरेन फ़िल्म्स् कॅटॅगरी मध्ये बर्याचशा फ़िल्म्स् मध्ये कधी कधी 'प्रौढांसाठी' चे सीन्स् असतात. त्यामुळे कुणी आपल्या मित्रांना फ़ेस्टिवलला खास 'तसले ' सीन्स् दाखवण्याकरता आणलेलं असतं. त्याची पण एक गम्मत आठवतेय मला, मल्टिप्लेक्स मध्ये एकाच वेळी ४-४ स्क्रीन्स वर फ़िल्म्स् चालू असतात, त्यामुळे नक्की कुठली फ़िल्म बघायची असा नेहमी गोंधळ होतो, अशातच एक उतावळा नमुना मागच्या वर्षी पहायला मिळाला, आम्ही ईटॅलियन फ़िल्म पहात होतो, आणि तो विचित्र मनुष्य दुसर्या स्क्रीनवरची फ़िल्म अर्धवट सोडून पटकन आमच्या इथे आला, आणि फोनवरून बाकीच्या मित्रांना बोलावत होता आमच्या स्क्रीन मध्ये..कारण त्याला त्याच्या कुणा एका मित्राने सांगितलं होतं (ज्याने हा चित्रपट आधी बघितलेला होता ) की, ती फ़िल्म सुरू झाल्यावर बरोब्बर ४५ मिनिटांनी आणि त्यानंतर २० मिनिटांनी असे दोन 'तसले ' सीन्स् आहेत आणि ते अगदी 'जमून' आलेयत. म्हणून तो बरोब्बर वेळेत आला होता... केवढी हि ओढ ? केवढी चित्रपटनिष्ठा ? आम्ही पुन्हा एकदा थक्क....!
एवढं करून ६० मिनिटं होऊन गेली तरी तो सीन येईना, म्हणून शेवटी तो वैतागला आणि घड्याळाकडे एक नजर टाकत, आमच्या स्क्रीनमधून धावत पळत दुसर्या स्क्रीनकडे पळाला, बहुतेक तिकडेही ह्याचं असंच कसलंतरी कॅल्क्युलेशन असणार... तो ईथून निघून गेला आणि ते दोन्ही सीन्स आले, आम्ही नेत्रं विस्फ़ारून ते पाहून घेतले ...खरंच जमून आले होते ते.. त्या बिचार्याचं दुर्दैव..... नक्कीच त्याचं घड्याळ बिघडलेलं असणार त्या दिवशी... कारण आमच्या ईथली फ़िल्म संपल्यावर जेव्हा आम्ही प्रेक्षागृहाच्या बाहेर आलो, तेव्हा तो दिसला आम्हाला....त्याचा चेहराच सांगत होता की त्याचे त्या फ़िल्म मधले सुद्धा 'ते' सीन्स बघायचे हुकले असणार... असे रग्गड नमुने आपल्याला फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये पहायला मिळतात.
फ़िल्म फ़ेस्टीवलबद्दल एक प्रचलित गैरसमज आहे की, तिथे फ़क्त ' प्रौढांसाठीचे च' किंवा बोअर , फ़्लॉप झालेले चित्रपट दाखवतात म्हणून.....पण तसं अजिबात नाहिये. ह्या गैरसमजाबद्दलचा सुद्धा एक किस्सा आहे, तो असा..
एक सद् गृहस्थ आपल्या फ़ॅमिलीला घेऊन फ़िल्म फ़ेस्टिवलला आले होते, त्यांनी एका तरूणांच्या चमूला विचारलं कि कुठले चित्रपट फ़ॅमिलीने बघण्याजोगे आहेत ? त्या तरूणांनी त्यांना सहकुटुंब-सहपरिवार , त्यादिवशीच्या खास " फ़क्त प्रौढांसाठीच" असलेल्या स्क्रीनमध्ये नेऊन बसवलं ... एकेक दृश्य समोर येताना त्या सद् गृहस्थांची काय अवस्था झालेली हे आख्ख्या प्रेक्षागृहाच्या नजरेतून लपलं नव्हतं , नंतर १० मिनिटांतच ते तिथून उठून निघून गेले...ते डायरेक्ट घरीच गेले असावेत.... कारण दिवसभरात कुठे दिसलेच नाहीत ते आम्हाला आख्ख्या मल्टिप्लेक्स मध्ये.... त्यामुळे तुमची अशी 'जाहीर फ़जिती' होऊ नये असं वाटत असेल तर सावध रहा.......
प्रत्येकाला इथे सगळ्या चित्रपटांची माहिती असलेलं माहितीपत्रक फ़ुकट मिळतं ते घ्यावं , किंवा मग चित्रपट सुरू व्हायच्या आधी प्रेक्षागृहाबाहेरच्या लोकांबरोबर ओळखी करून घ्यावात, त्यांना विचारावं की कुठले चित्रपट खरंच दर्जेदार आहेत, (अर्थात इथे तुमचं लक तुमच्या बरोबर असायला हवं की तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल आणि तिच्याकडून योग्य माहिती मिळेल ) .. मन पूर्वग्रहदूषित असेल तर तुम्हाला चित्रपटाचा निखळ आनंद उपभोगता येणार नाही.
ईथे सगळ्याच जॉनर मधले,सगळ्याच कॅटॅगरीमधले चित्रपट दाखवले जातात. कधी कधी तर आपण आपल्या रूटीन लाईफ़ मध्ये जे चित्रपट बघतो त्यापेक्षा 'जरा हटके' चित्रपट बघायला मिळतात, उच्च कोटीतले चित्रपट,दिग्दर्शकाची दृष्टी म्हणजे नेमकं काय, वगैरे हे सगळे आपल्याला ते चित्रपट बघितल्यावर कळतं. ईथे नेहमी येणारे जे लोक आहे, त्यांना शोधून (?) त्यांच्याशी ओळख करून घावी व ती वाढवावी, कारण कधी कधी फ़िल्म ईंडस्ट्रीमधल्या व्यक्तींकडे/संस्थांकडे सुद्धा मिळणार नाही अशी माहिती त्या लोकांकडे आपल्याला सचित्र स्वरूपात पहायला मिळते. आणि ते लोक ती माहिती कुणाशीही सहजासहजी शेअर करत नाहीत. ईथे डोकं चालवायला लागतं ती माहिती मिळवण्यासाठी... त्यातही वेगळीच मजा येते. ज्या लोकांना फ़िल्मलाईन मध्ये करीअर करायचं आहे त्यांनी तर जेवढे जास्त फ़िल्म फ़ेस्टिवल अटेंड करावेत तेवढं चांगलं . माझं स्वतः चं असं स्पष्ट मत आहे की, ज्याला एक परीपूर्ण ,प्रगल्भ आणि यशस्वी चित्रपट कारकीर्द करायची ईच्छा आहे त्याला हे फ़िल्म फ़ेस्टिवल्स् म्हणजे आयतं मिळालेलं ट्रेनिंग सेंटर आहे. (अर्थात् त्यासाठी एकलव्याचे गुण अंगी असायला हवेत, कारण तिथे तुम्हाला कुणी सांगायला येत नाही की, अमुक अमुक सीन कसा शूट केलाय, कॅमेरा आणि लाईट्स् कसे सेट केले आहेत, स्टुडिओ शॉट ला ईस्टॅब्लिश्ड शॉट चा ईफ़ेक्ट कसा आणलाय, वगैरे, वगैरे... ) त्यासाठी एक लहानशी डायरी आणि एक पेन जवळ ठेवावं, म्हणजे महत्त्वाची टिपणं लगेच टिपून घेता येतात.
ह्याच फ़िल्म फ़ेस्टीवलला एक 'रोमॅंटीक कॉर्नर' सुद्धा आहे, ईथे बर्याच जणांच्या 'जोड्या' जुळतात, एका फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये ओळख झाली की ती ओळ्ख वाढत जाते, म्ग पुन्हा दुसर्या कुठल्यातरी फ़िल्म फ़ेस्टीवलला भेट होते, असं करत करत नंतर मग , एकट्याने फ़ेस्टीवलला येणारे 'दुकटे' होऊन एकमेकांचा निरोप घेतात, (कधी कधी पुढच्या वर्षी तेच चेहरे आपल्याला पहायला मिळतात , फ़क्त त्यांचे पार्टनर्स बदललेले असतात.)
रूटीन लाईफ़ मध्ये फ़िल्म बघणं आणि फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये फ़िल्म बघणं यात तुलनाच करता येत नाही. घरी सुद्धा एखादा जुना चित्रपट बघताना क्वचित कंटाळाल्यासारखं होऊ शकेल, पण ईथे तसं कधीही होणार नाही. ईथे त्या चित्रपटात गुंग झालेली लोक पण पहायला मिळतात आणि तिथेच दुसरीकडे त्या चित्रपटावर कॉम्प्लीमेंट्स् पास करणारे टगे पण पहायला मिळतात, छान करमणूक होते.
तिथे येणार्या प्रत्येकाचे पोशाख सुद्धा कित्येकदा विचित्र असतात, खास करून तिथे येणार्या सगळ्या 'मॉड' आजीबाईंचे आणि आजोबांचे पोशाख, त्यांच्या अक्सेसरीज, अगदी धाडसाला दाद देण्याजोगं सगळं .... आमच्या आजी-आजोबांना कुणी हा अवतार दाखवू नका म्हणजे झालं....
आता थोडे वादाचे मुद्दे मांडतो...
जगात सर्वत्र फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबाबत बोलूच आपण, पण आपल्याकडे जे फ़िल्म फ़ेस्टीवल्स् होतात, त्याबद्दल बोलायचं तर , आयोजक नेहमी मल्टिप्लेक्स मध्येच चांगले ,दर्जेदार आणि विदेशी चित्रपट लावतात, आणि बाकिची जी ठिकाणं ठरवलेली असतात तिथे आपलेच जुने चित्रपट लावतात (जे चित्रपट केबल टि.व्ही. वर बघून बघून आपली त्याची पारायणं झालेली असतात), उदा. सांगायचं तर 'पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फ़ेस्टीवलमध्ये' , पुण्यातल्या सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये जी मुख्य 'पुणे गाव' (म्हणजे स्वारगेट, किंवा महत्त्वाच्या पेठा ,वगैरे) परीसरापासून दूर आहेत, तिथे सगळे परदेशी आणि दर्जेदार चित्रपट आणि 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ', 'गणेश कला-क्रीडा मंच' वगैरे ठिकाणी सगळे जुने भारतीय चित्रपट, असं का ? ईथल्या क्राऊडला सुद्धा परदेशी चित्रपट पहयचे असतात, त्यामुळे त्यांच्या सोईसाठी इथे सुद्धा परदेशी चित्रपट लावायला हवेत. फ़ेस्टीवल चालू असताना दररोज भाडं खर्च करून इतक्या लांब जाणं खिशाला परवडत नाही. आणि मल्टीप्लेक्स परीसरातील क्राऊड (आयनॉक्स, ई-स्क्वेअर, वगैरे) बर्यापैकी श्रीमंत आहे, आणि जसं आपल्याकडचा क्राऊड कायम भारतीय जुने चित्रपट बघत आलेला आहे, तसंच तो क्राऊड देखील कायम परदेशी चित्रपट बघणारा आहे. त्यामुळे उलट त्यांना भारतीय चित्रपट पहायला मिळावेत म्हणून तिथे तुम्ही भारतीय जुने चित्रपट लावा. आणि इथे परदेशी चित्रपट लावा. म्हणजे ज्याला जे रोजच बघायला मिळतं त्यापेक्षा काहितरी वेगळं बघायला मिळेल आणि 'फ़ेस्टीवल' या शब्दाचा खर्या अर्थाने त्यांना उपभोग घेता येईल. हाच मुद्द पुन्हा सोई-सुविधांसाठी सुद्धा मांडता येईल. त्या सगळ्यांना समान मिळायला हव्यात. परदेशी पाहुण्यांच आदरातिथ्य आपण करायला हवं , हे अगदी १०० % मान्य, पण त्यासाठी घरच्या पाहुण्यांना दुखावू नका.
अशाच अनेक आठवणी , भरमसाठ किस्से , चांगले-वाईट अनुभव, यातून बरंच काही शिकायला मिळतं, अगदीच काही नाही तरी एका वेगळ्या दुनियेत राहून आल्याचा आनंद मिळतो आणि तोच सर्वश्रेष्ठ असतो. कित्येक नवोदीत फ़िल्ममेकर्स आपली स्वप्नं घेऊन तिथे आलेले असतात. त्यातूनच एखाद्याला 'ब्रेक' मिळाला तर त्याच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ठरतो. अशा उगवत्या कलाकारांच्या कलाकृती आपल्याला तिथे पहायला मिळतात. त्यामुळे मी तर म्हणेन की, सगळे गैरसमज मनातून काढून टाका, आणि मुक्त मनाने फ़िल्म फ़ेस्टीवलचा आस्वाद घ्या.
Subscribe to:
Comments (Atom)



